दिल्लीच्या उठाठेवीपेक्षा गल्लीची माहिती ठेवा

 
भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे सचिन सावंत यांना प्रत्युत्तर

दिल्लीच्या उठाठेवीपेक्षा गल्लीची माहिती ठेवा

स्थलांतरित मजूरांकडून तिकिटाच्या भाड्याचा एकही पैसा रेल्वेने घेऊ नये असे जाहीर आव्हान देणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अशा प्रकारे दिल्लीची उठाठेव करण्यापूर्वी आपल्या गल्लीतील माहिती घ्यावी म्हणजे त्यांना समजेल कीदि. २ मे रोजी रेल्वेने राज्याला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले होते कीरेल्वे ही तिकिटे मजुरांच्या नव्हे तर राज्य सरकारांच्या हवाली करेल. त्यामुळे मजूरांकडून रेल्वेने पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीअसे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी दिले. 

सावंत यांना वास्तवाची माहिती नसल्याने त्यानी असे आव्हान दिल्याचे दिसते. रेल्वे बोर्डाच्या संचालकांनी या संदर्भात दि. २ मे रोजी सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून कामगारांसाठीच्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. त्यामध्ये मुद्दा ११ बी मध्ये म्हटले आहे की राज्य सरकारने संबंधित रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या स्पष्ट केल्यानंतर नेमकी तेवढीच तिकिटे रेल्वे छापेल आणि राज्य सरकारच्या हवाली करेल. राज्याच्या मुख्य सचिवांकडून हे पत्र घेऊन सावंत यांनी वाचावे म्हणजे ते गल्लीची माहिती नसताना दिल्लीची उठाठेव करणार नाहीतअसे उपाध्ये म्हणाले. 

केशव उपाध्ये यांनी सांगितले की राज्य सरकारांच्या विनंतीवरून या विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यासाठीच्या तिकिटांची रक्कम राज्य सरकार कामगारांच्या वतीने भरू शकते. तेवढी संवेदनशीलता सावंत यांच्या महाविकास आघाडी सरकारने दाखवावी. या रेल्वेगाड्या नेहेमीच्या प्रवासी गाड्या नाहीत. त्या खास गाड्या आहेत. या गाड्या विनाथांबा धावतातत्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी मर्यादित प्रवासी आहेतपरत येताना रेल्वेगाडी रिकामी येणार आहेनेहेमीपेक्षा अधिक स्वच्छता राखावी लागणार आहे असे विविध वाढीव खर्च असताना रेल्वेने स्वतःवर ८५ टक्के बोजा घेऊन केवळ पंधरा टक्के खर्च तिकिटांवर आकारला आहे. तो सुद्धा देण्यास राज्य सरकार तयार नसेल तर हा असंवेदनशीलतेचा कळस झाला. 

ते म्हणाले की गर्दी उसळली की कोरोना फैलावला हा धोका ध्यानात घेऊन श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांमध्ये झुंबड उडू नयेकोणीही आले आणि तिकिट काढून गाडीत बसले असे होऊ नयेगाडीतून जाणाऱ्या प्रवाशांची नोंद असली पाहिजे या हेतूने नेमकी तिकिटे छापून ती राज्य सरकारच्या हवाली करण्याचा निर्णय झाला. राज्य सरकार त्याची रक्कम मजुरांकडून वसूल करण्याऐवजी स्वतः भरण्याचा उदारपणा दाखवेल तर ते सावंत यांना अपेक्षित संवेदनशीलतेने होईल.

From around the web