
मुंबई - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) फेब्रुवारी/मार्च २०१२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ६७.९४ टक्के इतका लागला आहे. १२वीच्या परीक्षेत यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र दिसत असून ७९.६६ टक्के मुली तर ७०.३२ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कला शाखेचा निकाल ६५.६९ टक्के, वाणिज्य शाखेचा ७१.४३ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ८४.८७ टक्के इतका लागला आहे. राज्यात कोकण विभागाने बाजी मारली असून कोकणात ८६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अमरावतीचा निकाल सर्वात कमी लागला असून अमरावतीमधून ६२.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागांचे निकाल
मुंबई - ७६.१४
पुणे - ८२.१२
नाशिक - ७३.९९
कोल्हापूर - ८२.१४
नागपूर - ६८.९३
औरंगाबाद - ६७.१०
कोकण- ८६.२५
अमरावती - ६२.८७
लातूर- ७५.४६
|