
उस्मानाबाद -येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाच्या उपक्रमात सोमवारी १८ निवेदने प्राप्त झाली. जिल्हाधिकारी के. एम. नागरगोजे यांनी यावेळी ही निवेदने स्वीकारली आणि नागरिकांची गा-हाणी ऐकून घेतली. तक्रारीशी निगडीत विविध विभाग प्रमुखांना त्यांनी त्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता के. बी. राठोड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
|